![]()  | 
    
सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पर्वात विद्यालयाने अनेक चढ- उतार अनुभवले शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी असलेल्या प्रयत्नांना थोडीफार खीळ बसण्याचे धक्के सहन करताना मनाला वेदना होत होत्या ज्या विद्यालयाने यशाचे माउंट एव्हरेस्ट पाहिले. त्यात विद्यालयाची मोहीम थोडीफार थंडावल्यासारखी अवस्था निर्माण झाली. थोडक्यात म्हणायचे झाले तर ‘पठारावस्था’ होण्यासारखी स्थिती निर्माण झाली. परंतु काळ कोणासाठी थांबत नाही.
                   कनिष्ठ महाविद्यालयाची निर्मिती ही खरेतर आम्ही यशवंत  परिवारचे घटक एक ऐतिहासिक घटना समजतो. त्याहीपुढे जाऊन त्यांनी २००५- १० मध्ये  परिसरतील पालक – विद्यार्थींसाठी एक अनमोल सुवर्णसंधी प्राप्त करून दिली. श्री.  शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल अॅड.  ललित  चव्हाण यांनी मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत सुरू केले. इंग्रजी माध्यमाकडे वाढणारा  पालकांचा ओढा त्यासाठी खूप दूरवर जाऊन महागडे   शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचा त्यांनी अभ्यास केला. आणि परिसरातील ही एक गंभीर  आणि आव्हानात्मक समस्या त्यांच्या दूरदृष्टीन सोडवली गेली.२०१२-१३ या शैक्षणिक  वर्षात नर्सरी पासून इ. ३ री पर्यंत २०० विद्यार्थी गुणवत्तपूर्व शिक्षण घेत आहेत.  हे सर्व होताना भौतिक सुविधांचा अभाव निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी  नवीन ७ खोल्या बांधल्या संगणकाचे ज्ञानही या विद्यार्थींना मिळावे, म्हणून संगणक कक्ष  अत्यंत अत्याधुनिक केला. व विनामूल्य शिक्षणाची दारे बहुजन समाजातील  विद्यार्थ्यांना खुली करुन दिली. 
                      भविष्यात या विद्यालयच उत्कर्षाच्या दिशेने याहीपेक्षा दमदार,  आश्वासक अशी विचारधारा सदैव जागृत राहिल,यात शंका नाही.  फिनिक्स पक्षी जरुर आपल्या जिवनकाळात उभारी घेतो. त्या प्रमानेच या विद्यालयाचा  विकास उत्तरोत्तर प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाने फुलत रहवा,यासाठी  यशवंत परिवार सदैव जगरुक राहणार आहे. सर्व संचालक मंडळ,आजी-माजी  शिक्षक,विद्यार्थी,पालक, ग्रामस्थ त्यासाठी सकारात्मक पायवाटेने या पंचक्रोशीचा उध्धार करतील यासाठी  सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे.हा लाखमोलाचे ‘यशवंत’ विचार तळागाळातील लोकांच्या विकासासाठी,पंचक्रोशींच्या  कल्याणासाठी,विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी अधिक प्रफुल्लीत  व्हावा ,हिच परमेश्वराजवळ प्रार्थना!!!
                     सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पर्वात  विद्यालयाने अनेक चढ- उतार अनुभवले  शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी  असलेल्या प्रयत्नांना थोडीफार खीळ बसण्याचे धक्के  सहन करताना मनाला वेदना होत होत्या ज्या  विद्यालयाने यशाचे  माउंट एव्हरेस्ट  पाहिले. त्यात विद्यालयाची मोहीम थोडीफार थंडावल्यासारखी अवस्था निर्माण झाली.  थोडक्यात म्हणायचे झाले तर ‘पठारावस्था’ होण्यासारखी स्थिती  निर्माण झाली. परंतु काळ कोणासाठी थांबत नाही.